19/04/2023
देगलुर तालुक्यात साखर कारखाना होणारच... देशमुखांची ग्वाही
नांदेड जिल्यातील देगलूर तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक सीमेवरती शेकडो सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर तसेच सर्व जाती धर्मातील बंधू भगिनी आणि व्यापारी यांचे आर्थिक दृष्ट्या सबलीकरणं करुन सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध होऊन आपल्या मामकुळात लातूरमधील देशमुखानी *सिद्धटेक शेतकरी साखर कारखाना* उभा करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाची जागा तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवर ठरलेली असून काही मोजक्या राजकारन्याना तालुक्याच्या राजकारणात खूप मोठा भूकंप होईल अशी भीती वाटत आहे. त्यामुळे ते या प्रकल्पासाठी विरोध करत आहेत. स्वतःचा लालसेपोटी चांगल्या प्रकल्पाला विरोध होत आहे हे बघून तालुक्यातील सर्व स्तरातील बांधवांनी एकत्र येऊन कारखान्याचे चेअरमन श्री सचिन देशमुख यांची दिनांक 18 एप्रिल रोजी भेट घेतली. यावेळी कितीही विरोध झाला तरी फक्त प्रकल्पाची जागा बदल होईल पण कारखाना याच तालुक्यात होईल अशी ग्वाही देशमुख साहेबांनी यावेळी दिली. तसेच या भागातील काही राजकारणी
पुढाऱ्यामुळे मागच्या वीस वर्षांमध्ये जो आर्थिक विकास व भरभराटी थांबली ती प्रगती आता या कारखान्यामुळे होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.