09/08/2026
९ ऑगस्ट – ऑगस्ट क्रांती दिन...
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा निर्णायक टप्पा ठरलेला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ हा देशभक्ती, बलिदान आणि लोकशाही मूल्यांचा प्रेरणादायी दिवस आहे. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला — ब्रिटिश सत्तेला भारतातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा!
याच पार्श्वभूमीवर, ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर गांधीजींनी केलेलं ‘करो या मरो’ हे आवाहन आणि ‘भारत छोडो’ हा इंग्रजांना दिलेला इशारा यामुळे देशभरात चैतन्य पसरले. या आंदोलनाने भारतीयांत प्रचंड जागृती केली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे ठाकलेले सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या लढ्याचा भाग बनला. या आंदोलनात हजारो लोकांना तुरुंगवास, शारीरिक छळ सोसावा लागला प्राणाची आहुती द्यावी लागली. हे आंदोलन सुमारे साडेचार वर्षे चालले. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने स्वातंत्र्य मिळवलं.
आजचा दिवस म्हणजे केवळ इतिहास आठवण्याचा नव्हे, तर त्यातून प्रेरणा घेऊन देशहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्याचा!, आज आपण त्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञतेने वंदन करू या ज्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा श्वास मुक्तपणे घेता येतो आहे.
जय हिंद!
#स्वातंत्र्यलढा #ऑगस्टक्रांतिदिन #महात्मा_गांधी #भारतछोडोआंदोलन #करो_या_मरो #क्रांतिकारक #स्वातंत्र्यसैनिक #हुतात्मा #देशभक्ती #प्रणाम